समुद्रकिनारे
किल्ले
धार्मिक स्थळे
अभयारण्ये
ट्रेकींग
निसर्ग सौदर्य
वारसा स्थळे
साहसी खेळ
आकर्षणे
अॅग्रो टुरिझम
अध्यात्मिक ठीकाणे
४०० वर्षे जुने गणपतीचे स्वयंभू मंदीर आणि सोनेरी वाळूचा समुद्रकिनारा
गणपतीपुळे (Ganpatipule) हे शांत, निसर्गसंपन्न आणि मानवी अतिक्रमणापासून (अद्यापतरी) दुर असणारं ठिकाण आहे. नैसर्गिक समुद्रकिनारा आणि आठवणीत ठेवावा अशा मार्गाने प्रवास आपली सहल अविस्मरणीय करते. लाल मातीत वसलेली छोटी छोटी खेडी, रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगर्द झाडी, आणि सुखाचा प्रवास करवणारे रस्ते, आजुबाजुचे वातावरण पवित्र आणि प्रसन्न करणारे गणेश मंदीर आणि समोर पसरलेला सोनेरी वाळूतला समुद्र, नारळी पोफळीच्या बागा… आणि कोकणातली साधी माणसं… गणपतीपुळे खऱया अर्थाने आपल्याला घराजवळ असणारा अनुभव देतो.
महादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद
रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारे हरिहरेश्वर येथे असणारे महादेवाचे मंदीर भाविकांचे विशेष श्रद्धास्थान हे म्हसाळ्यापासून दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे तीन फाटे फुटतात. या फाट्यापासून साधारण १६ कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.
शंभो शंकराचे वास्तव्य असणारे सुंदर बीच
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी पासून सुमारे 70 की.मी. अंतरावर वेळणेश्वर (Velaneshwar) आहे. अत्यंत सुंदर मऊशार वाळूचा समुद्रकिनारा, सोबत वेळणेश्वर शिवशंभोचे मंदिर या परिसरास खऱ्या अर्थाने शोभा आणतात. सर्व जगापासून लांब एकांतात जावे आणि एक शांत आयुष्य जगावे वाटले की भेट द्यावी असे हे ठिकाण....
शिवशंकराचे प्राचिन देवस्थान
पुणे जिल्ह्यामध्ये अनेक देवस्थाने वसलेली आहेत. यामध्ये बरिचशी शंकराची देवस्थाने असून ती ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. प्राचीन देवस्थाने असुनही सुस्थितीत आणि फारशी माहित नसणारी जी ठिकाणे आहेत त्यापैकी एक म्हणजे पांडेश्वर (Pandeshwar) येथील महादेवाचे मंदिर.
पुराणकालीन संदर्भ असणारा अष्टविनायकांमधील महागणपती
पुण्यापासून 50 कि.मी. अंतरावर असणाऱया शिरूर तालुक्यात असणारे रांजणगाव अष्टविनायकांमधील महागणपतीसाठी प्रसिद्ध आहे. या गणपतीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये गणेशोत्सवाच्या काळात घरामध्ये गणपतीची स्थापना करत नाहीत. या मंदिराच्या इतिहासानुसार हे मंदिर नवव्या किंवा दहाव्या शतकात बांधले गेलेले आहे.
श्रीविष्णूजी द्वारा स्थापित प्राचिन गणेश मंदिर
महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असणारा सिद्धीविनायक हा अहमदनगर येथील सिद्धटेक (Siddhatek) येथे वसलेला आहे. अष्टविनायकांमध्ये उजव्या सोंडेचा असणारा हा एकमेव गणपती आहे. प्राचीन कथेप्रमाणे श्रीविष्णूने मधु व कैटभ राक्षसांना मारण्यापुर्वी या गणेशाची स्थापना करून त्याची आराधना केली होती.
भाविकांचं श्रद्धास्थान असणारे वाईतील गणेश मंदिर
'दक्षिण काशी'अशी ओळख असणारे वाई मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. पुण्यापासून 95 कि.मी. अंतरावर असणारे वाई शहर सातारा जिल्ह्यात वसलेले असून सातारा शहराच्या उत्तरेला 35 कि.मी. अंतरावर आहे.
यवतजवळील प्राचिन आणि शांत असे महादेवाचे पांडवकालीन मंदिर
पुणे जिल्ह्यामध्ये प्राचिन आणि ऐतिहासिक अशी बरीच धार्मिक स्थळे आहेत. अशाच प्राचिन धार्मिक स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे भूलेश्वर देवस्थान. पुण्यापासून केवळ 50 कि.मी. अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर यवतजवळ हे महादेवाचे देवस्थान आहे. एका डोंगरावर वसलेले हे मंदिर पांडवकालीन असून शांत आणि धीरगंभीर वातावरणामुळे आपले येथे जाणे एक सुखकर अनुभव ठरतो.
बनामध्ये वसलेल्या महादेवाचं शांत आणि सुंदर मंदिर
पुणे - सातारा महामार्गावर पुण्यापासून 35 कि.मी. अंतरावर नसरापूर येथे बनेश्वर येथे शंकराचे मंदिर आहे. शांत आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले हे मंदिर अत्यंत साधे आणि तरिही सुंदर आहे. जंगल म्हणजे बन आणि या बनामध्ये वसलेला ईश्वर म्हणजे बनेश्वर.