समुद्रकिनारे
किल्ले
धार्मिक स्थळे
अभयारण्ये
ट्रेकींग
निसर्ग सौदर्य
वारसा स्थळे
साहसी खेळ
आकर्षणे
अॅग्रो टुरिझम
कधी जाल?
ऑक्टोबर ते एप्रिल
तापमान
२६ - ३२
एकुण जिल्हे
35
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी
रायगड जिल्ह्यात महाडजवळ सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगात वसलेला किल्ला म्हणजे रायगड (Raigad). ट्रेकर्स, पर्यटक या सर्वांकरिताच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील जनतेला रायगडबद्दल एक वेगळाच आदर आहे. त्याचे कारण म्हणजे स्वराज्याचे संस्थापक आणि संपुर्ण महाराष्ट्राचे दैवस्वरूप शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला होता. महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते महाराजांच्या अंतिम काळापर्यंत राजांनी याच किल्ल्यावरून राज्य चालवले.
एकदिवसीय ट्रीपसाठीचे सर्वात पॉप्युलर ठिकाण
रायगड जिल्ह्यात असणारे अलिबाग (Alibaug) पुणे तसेच मुंबईच्या पर्यटकांचे एकदिवसीय ट्रीपसाठी आवडते बीच म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे केवळ 3-4 तासात पोहोचण्याचे नियोजन करता येते. आणि त्याचमुळे पर्यटक झटपट ट्रीपसाठी या ठिकाणास पहिली पसंती देतात.
श्रीवर्धन जवळचे एक शांत आणि सुंदर बीच
रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये असणारे दिवेआगर (Diveagar) हे सुवर्ण गणेश मंदिर आणि शांत व सुंदर बीचसाठी प्रसिद्ध आहे. अलिकडच्या काळात वीकेंड आणि सुटीच्या दिवसांमध्ये गर्दी होणारे बीच अशी दिवेआगरची ओळख आहे.
300 वर्षापेक्षा जास्त काळ समुद्राच्या रौद्र लाटांनाही न मानणारा अभेद्य किल्ला
भर समुद्रात रौद्र लाटांना तोंड देत उभा असणारा एक अद्वितीय आणि एकमेव अजिंक्य राहिलेला किल्ला म्हणजे मुरूड जंजीरा. रायगड जिल्ह्यात मुरूड गावाजवळ समुद्रात असणारा हा किल्ला पुणे आणि मुंबई पासून साधारण १८० कि.मी. अंतरावर आहे.