सामंत बीच रिसॉर्ट : भोगवे बीचजवळील एक सुंदर रिसॉर्ट
वेंगुर्ल्यामधील एक स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा देवबाग बॅकवॉटर जवळ असणाऱ्या भोगवे गावातल्या कोळवेल वाडीमध्ये आहे आपल्याला राहण्याचा सुंदर अनुभव देणारे सामंत बीच रिसॉर्ट
वेंगुर्ल्यामधील एक स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा देवबाग बॅकवॉटर जवळ असणाऱ्या भोगवे गावातल्या कोळवेल वाडीमध्ये आहे आपल्याला राहण्याचा सुंदर अनुभव देणारे सामंत बीच रिसॉर्ट
भटकणं हा आमच्यासारखाच अनेकांचा आवडता छंद असेल याची आम्हाला खात्री आहे. आपण अनेक ठिकाणी फिरतो. काही जणांना समुद्रकिनारे आवडतात तर काही जणांना गड-किल्ले खुणावतात. काही जणांना खोल जंगलात फिरायला अावडतं तर काही जणांना प्राचीन लेणी अभ्यासायला आवडतात. काही जण नवीन नवी जागा शोघत असतात.
पावसाळा संपलाय, समुद्राचं उधाण शांत झालंय, दसरा आणि दिवाळी साजरी झालीय. आणि याच बरोबर आपल्याला हिवाळ्याची चाहूल ही लागलीय.
किल्ले पद्मदुर्ग हा स्थानिकांना कासा किल्ला या नावाने माहित आहे. समुद्रामध्ये असणारे जे मोजके 5-6 किल्ले आहेत त्यापैकी एक पद्मदुर्ग. मुरूडमधील सिद्दींच्या मुरूड जंजीऱ्याला शह देण्यासाठी आणि सिद्दींवर आपला वचक रहावा यासाठी हा किल्ला बांधण्यात आला.
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी पासून सुमारे 70 की.मी. अंतरावर वेळणेश्वर (Velaneshwar) आहे. अत्यंत सुंदर मऊशार वाळूचा समुद्रकिनारा, सोबत वेळणेश्वर शिवशंभोचे मंदिर या परिसरास खऱ्या अर्थाने शोभा आणतात. सर्व जगापासून लांब एकांतात जावे आणि एक शांत आयुष्य जगावे वाटले की भेट द्यावी असे हे ठिकाण....
रायगड जिल्ह्यात वसलेले श्रीवर्धन हे पर्यटकांच्या सर्वाधिक आवडीच्या काही ठिकाणांपैकी एक आहे. श्रीवर्धनमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर समुद्रकिनारे आहेत.
अलिबाग – मुरूड रस्त्यावर वसलेले काशिद हे अलिबाग पासून 30 कि.मी. अंतरावर असून आपल्या निळाशार किनारा, चमचमणारी पांढरी वाळू आणि आजुबाजूला असणाऱया निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.
रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारे हरिहरेश्वर येथे असणारे महादेवाचे मंदीर भाविकांचे विशेष श्रद्धास्थान हे म्हसाळ्यापासून दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे तीन फाटे फुटतात. या फाट्यापासून साधारण १६ कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.
भर समुद्रात रौद्र लाटांना तोंड देत उभा असणारा एक अद्वितीय आणि एकमेव अजिंक्य राहिलेला किल्ला म्हणजे मुरूड जंजीरा. रायगड जिल्ह्यात मुरूड गावाजवळ समुद्रात असणारा हा किल्ला पुणे आणि मुंबई पासून साधारण १८० कि.मी. अंतरावर आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये असणारे दिवेआगर (Diveagar) हे सुवर्ण गणेश मंदिर आणि शांत व सुंदर बीचसाठी प्रसिद्ध आहे. अलिकडच्या काळात वीकेंड आणि सुटीच्या दिवसांमध्ये गर्दी होणारे बीच अशी दिवेआगरची ओळख आहे.
रायगड जिल्ह्यात असणारे अलिबाग (Alibaug) पुणे तसेच मुंबईच्या पर्यटकांचे एकदिवसीय ट्रीपसाठी आवडते बीच म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे केवळ 3-4 तासात पोहोचण्याचे नियोजन करता येते. आणि त्याचमुळे पर्यटक झटपट ट्रीपसाठी या ठिकाणास पहिली पसंती देतात.
रायगड जिल्ह्यात महाडजवळ सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगात वसलेला किल्ला म्हणजे रायगड (Raigad). ट्रेकर्स, पर्यटक या सर्वांकरिताच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील जनतेला रायगडबद्दल एक वेगळाच आदर आहे. त्याचे कारण म्हणजे स्वराज्याचे संस्थापक आणि संपुर्ण महाराष्ट्राचे दैवस्वरूप शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला होता. महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते महाराजांच्या अंतिम काळापर्यंत राजांनी याच किल्ल्यावरून राज्य चालवले.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरापासून सुमारे 11 कि.मी. अंतरावर असणारे मुरूड हे छोटेसे गाव आपल्या लांबलचक, शांत आणि चमकणाऱया मऊ रेतीच्या समुद्रकिनाऱयामुळे प्रसिद्ध आहे. प्राचीन देवीचं मंदीर, हवेत हेलकावे घेणारी पोफळीची झाडे आणि समोर पसरलेला शांत, अथांग समुद्र ही मुरूडच्या बीचची खास वैशिष्ये म्हणता येतील.
चिपळूणपासून चाळीस किलोमीटर अंतरावर वसिष्ठी नदी आणि जयगड खाडीच्यामध्ये गुहागर वसलंय. एकेकाळी फारसं कोणाला माहित नसलेलं गुहागर आता कोकणातलं एक popular destination बनत आहे.
गणपतीपुळे (Ganpatipule) हे शांत, निसर्गसंपन्न आणि मानवी अतिक्रमणापासून (अद्यापतरी) दुर असणारं ठिकाण आहे. नैसर्गिक समुद्रकिनारा आणि आठवणीत ठेवावा अशा मार्गाने प्रवास आपली सहल अविस्मरणीय करते. लाल मातीत वसलेली छोटी छोटी खेडी, रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगर्द झाडी, आणि सुखाचा प्रवास करवणारे रस्ते, आजुबाजुचे वातावरण पवित्र आणि प्रसन्न करणारे गणेश मंदीर आणि समोर पसरलेला सोनेरी वाळूतला समुद्र, नारळी पोफळीच्या बागा… आणि कोकणातली साधी माणसं… गणपतीपुळे खऱया अर्थाने आपल्याला घराजवळ असणारा अनुभव देतो.