मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग
मुंबई आणि रत्नागिरी दरम्यान सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) रत्नागिरीतील भगवती आणि भाट्ये परिसराची चाचपणी सुरू केली असून, यामुळे कोकण पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद होणार आहे.


