कोकण नव्याने अनुभवा
कोकणातील लपलेली ठिकाणे, गड-किल्ले, आणि अथांग समुद्रकिनाऱ्यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी.
प्रमुख पर्यटन स्थळे

पाळंदे बीच
दापोलीतील एक शांत समुद्रकिनारा
दापोली तालुक्यातील मुरूड बीच आणि हर्णै बीच या रस्त्यावरून जाताना हर्णे पासून साधार तीन कि.मी. अंतरावर एक शांत समुद्रकिनारा दिसेल. हा समुद्रकिनारा म्हणजेच पाळंदे बीच.

सिंधुदुर्ग किल्ला
शिवाजी महाराजांचे लष्करी मुख्यालय
सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांचे लष्करी मुख्यालय म्हणून ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनाऱ्यापासून थोडाच आत असलेल्या या किल्ल्यामुळे पोर्तुगीज, डच, इंग्रज, सिद्दी अशा अनेक स्वराज्य शत्रुंना वचक बसलेला होता.
नळदुर्ग किल्ला
रसिकतेची ग्वाही देणारा किल्ला
एकेकाळी धाराशीव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्यालय असलेले नळदुर्ग हे उस्मानाबादच्या आग्नेयेकडे सुमारे ५० किमी अंतरावर आहे.नळदुर्ग किल्ला हा याच उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग शहरातील एक ऐतिहासिक किल्ला आहे.
गणपतीपुळे
४०० वर्षे जुने गणपतीचे स्वयंभू मंदीर आणि सोनेरी वाळूचा समुद्रकिनारा
गणपतीपुळे (Ganpatipule) हे शांत, निसर्गसंपन्न आणि मानवी अतिक्रमणापासून (अद्यापतरी) दुर असणारं ठिकाण आहे. नैसर्गिक समुद्रकिनारा आणि आठवणीत ठेवावा अशा मार्गाने प्रवास आपली सहल अविस्मरणीय करते. लाल मातीत वसलेली छोटी छोटी खेडी, रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगर्द झाडी, आणि सुखाचा प्रवास करवणारे रस्ते, आजुबाजुचे वातावरण पवित्र आणि प्रसन्न करणारे गणेश मंदीर आणि समोर पसरलेला सोनेरी वाळूतला समुद्र, नारळी पोफळीच्या बागा… आणि कोकणातली साधी माणसं… गणपतीपुळे खऱया अर्थाने आपल्याला घराजवळ असणारा अनुभव देतो.
गुहागर
सर्वात लांब आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं ठिकाण
चिपळूणपासून चाळीस किलोमीटर अंतरावर वसिष्ठी नदी आणि जयगड खाडीच्यामध्ये गुहागर वसलंय. एकेकाळी फारसं कोणाला माहित नसलेलं गुहागर आता कोकणातलं एक popular destination बनत आहे.
मुरूड बीच
दापोली जवळील शांत आणि आनंददायक समुद्रकिनारा
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरापासून सुमारे 11 कि.मी. अंतरावर असणारे मुरूड हे छोटेसे गाव आपल्या लांबलचक, शांत आणि चमकणाऱया मऊ रेतीच्या समुद्रकिनाऱयामुळे प्रसिद्ध आहे. प्राचीन देवीचं मंदीर, हवेत हेलकावे घेणारी पोफळीची झाडे आणि समोर पसरलेला शांत, अथांग समुद्र ही मुरूडच्या बीचची खास वैशिष्ये म्हणता येतील.
किल्ले रायगड
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी
रायगड जिल्ह्यात महाडजवळ सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगात वसलेला किल्ला म्हणजे रायगड (Raigad). ट्रेकर्स, पर्यटक या सर्वांकरिताच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील जनतेला रायगडबद्दल एक वेगळाच आदर आहे. त्याचे कारण म्हणजे स्वराज्याचे संस्थापक आणि संपुर्ण महाराष्ट्राचे दैवस्वरूप शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला होता. महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते महाराजांच्या अंतिम काळापर्यंत राजांनी याच किल्ल्यावरून राज्य चालवले.
अलिबाग बीच
एकदिवसीय ट्रीपसाठीचे सर्वात पॉप्युलर ठिकाण
रायगड जिल्ह्यात असणारे अलिबाग (Alibaug) पुणे तसेच मुंबईच्या पर्यटकांचे एकदिवसीय ट्रीपसाठी आवडते बीच म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे केवळ 3-4 तासात पोहोचण्याचे नियोजन करता येते. आणि त्याचमुळे पर्यटक झटपट ट्रीपसाठी या ठिकाणास पहिली पसंती देतात.
तुमच्यासाठी सर्वोत्तम हॉटेल्स
कोकणातील उपक्रम आणि साहसी खेळ
सध्या उपक्रम उपलब्ध नाहीत
या श्रेणीत लवकरच नवीन उपक्रम आणि इव्हेंट्स जोडले जातील.
कोकण पर्यटन बातम्या
कोकण समजून घेण्यासाठी,
भटकंतीला उपयोगी पडणारी माहिती.
'कोकण भटकंती'चा उद्देश कोकणातील ठिकाणे, राहण्याचे पर्याय, जेवण, प्रवासाची साधने आणि स्थानिक माहिती एकाच ठिकाणी नीट मांडणे हा आहे. सहल ठरवताना कुठे जायचे, कसे पोहोचायचे, आसपास काय पाहता येईल आणि कोणत्या गोष्टी आधी लक्षात घ्याव्यात, यासाठी हा उपयुक्त संदर्भ तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.





